Showing posts with label news india. Show all posts
Showing posts with label news india. Show all posts

Friday, May 1, 2020

देशात १३० जिल्हे लाल, तर ३१९ हिरव्या श्रेणीत

देशात १३० जिल्हे लाल, तर ३१९ हिरव्या श्रेणीत


केंद्र सरकारने शुक्रवारी दोन आठवडय़ांसाठी टाळेबंदी वाढवितानाच आरोग्य मंत्रालयाने देशभरातील करोनाबाधित लाल, नारंगी आणि हिरव्या श्रेणी (झोन) जाहीर केल्या आहेत. देशभरातून १३० जिल्हे हे लाल श्रेणीत आहेत, तर २८४ जिल्हे हे नारंगी श्रेणीत आणि ३१९ जिल्हे हे हिरव्या श्रेणीत आहेत.
करोनाबाधित रुग्णांची संख्या, रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण, चाचण्यांचे प्रमाण याचा विचार करून या श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. हे क्षेत्र हे आठवडाभरासाठी वा त्याहून कमी कालावधीसाठी तयार केले असून त्यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नव्या वर्गीकरणानुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळूरू आणि अहमदाबाद यासारख्या महानगरांचा समावेश लाल श्रेणीत करण्यात आला आहे. राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना मंत्रिमंडळ सचिवांनी ही माहिती दिली.
श्रेणींची विभागणी
लाल श्रेणी : वाढते रुग्ण. अधिक संख्येने नमुना चाचण्या होत असलेले जिल्हे.
नारंगी श्रेणी : लाल आणि हिरव्या श्रेणी नसलेले जिल्हे.
हिरवी श्रेणी : सलग २१ दिवस नवे रुग्ण आढळले नाहीत असे जिल्हे.
नियंत्रित विभाग : लाल व नारंगी श्रेणीतील अतिसंवेदनशील विभाग
नारंगी श्रेणीतील मुभा
* टॅक्सी आणि अ‍ॅपवरील टॅक्सीसेवा. चालक आणि दोन प्रवासी.
* आंतरजिल्हा प्रवास. पण, स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने.
* चारचाकी गाडय़ांमध्ये जास्तीत जास्त चालकासह दोन व्यक्तींना मुभा.
लाल श्रेणीत बंदी
* लाल श्रेणीमध्ये सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, टॅक्सी अपसेवा, आंतर जिल्हा आणि जिल्ह्य़ांतर्गत बससेवा, केशकर्तनालय, स्पा, सलून या सेवांवर बंदी.
लाल श्रेणीत मुभा
* स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने चालकासह कमाल दोघांना वाहनातून जाण्यास परवानगी. दुचाकीवर दोन व्यक्तींना परवानगी.
* औषधनिर्मिती, कच्चा माल प्रक्रिया, आयटी हार्डवेअर, बांधकामे.
* जीवनावश्यक आणि बिगरजीवनावश्यक वस्तूंची स्वतंत्र दुकाने.
* ई-कॉमर्सद्वारे जीवनावश्यक सेवांनाच परवानगी.
* वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे व्यवहार.
* सरकारी आणि खासगी कार्यालये खुली राहतील. ३३ टक्के कर्मचारी.
* शेती आणि कुक्कुटपालन
* बँक, विमा आदी वित्तीय संस्था.
* व्यापारी व खासगी कार्यालये, संस्था.
* अंगणवाडी, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्ता, महिलांसंबंधी संस्था.
अन्य बाबी..
* बिगर जीवनावश्यक सेवा फक्त सकाळी ७ ते संध्या ७ सुरू राहील. गरज भासल्यास जमावबंदी लागू.
* सर्व श्रेणींमध्ये ६५ वर्षांहून अधिक वयोगटातील मधुमेह वगैरे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुलांनी घरातच राहणे गरजेचे.
* तीनही श्रेणीत बाह्य़रुग्ण विभाग सुरू राहतील. पण, नियंत्रित विभागात मात्र मुभा नाही.

रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई-पुण्यात काय सुरु राहणार समजून घ्या…

रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई-पुण्यात काय सुरु राहणार समजून घ्या…



केंद्र सरकारने आणखी दोन आठवडयांसाठी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा तिसरा लॉकडाउन आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपणार आहे. आता १७ मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. करोना रुग्णांच्या संख्येनुसार सरकारने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन बनवले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करताना काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु सारखी महानगरांचा रेड झोनमध्ये समावेश होतो. लॉकडाउन कायम राहणार असला तरी रेड झोनमध्ये व्यापार, व्यवसायासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत.
– रेड झोनमधल्या व्यावसायिक आणि खासगी आस्थापनांना काम सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
– प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आयटी, माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा, कॉल सेंटर, शीतगृह गोदाम, खासगी सुरक्षा सेवा, सुरु राहणार आहेत.

– जीवनावश्यक वस्तुंची निर्मिती करणारे उत्पादन कारखाने, यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, ताग उद्योग, आयटी हार्डवेअरशी संबंधित उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे

लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना मूळगावी जाण्यासाठी नियोजन सुरू : परिवहन मंत्री

लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना मूळगावी जाण्यासाठी नियोजन सुरू : परिवहन मंत्री

मुंबई : परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात सुखरूप पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, आणि राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांना सुद्धा मूळ गावी पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे अशी महिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे

नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे आणि बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ग्रुप लीडरच्या माध्यमातून नोंदणी करावी. नोंदणी करत असताना नाव, सध्या रहात असलेला पत्ता, कुठे जाणार आहे त्या ठिकाणाचा पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर यांची नोंद करावी. आणि त्यांना बसनी प्रवास करायचा आहे का रेल्वेनी यांचीही नोंद त्यात करावी. जाणाऱ्या लोकांची संख्या जर एक हजार असेल तर रेल्वेने प्रवासाची व्यवस्था आणि 25 संख्या असेल तर बसने प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी करून त्यांना डॉक्टरांचे तपासणी प्रमाणापत्र सोबत देण्यात येईल.
राज्यांतर्गत अडकलेले लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र जर एखाद्या शहरात किंवा भागात कंटामेंन्ट झोन, हॉटस्पॉट जाहीर केला असेल तर त्यांना त्या ठिकाणाहून जाण्यासाठी परवानगी नाही.

प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर यासाठी नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी समन्वय साधून शासनामार्फत व्यवस्था केली जाईल. त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, गर्दी करू नये असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.


Thursday, April 30, 2020

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी - राजेश टोपे

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी - राजेश टोपे



मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आता प्लाझ्या थेरपीचा आधार घेण्यात येत आहेत. जे कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झालेत आहेत. त्यांच्या प्लाझ्मा घेऊन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली असून, आता दुसऱ्या रुग्णावर पुन्हा प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितले. 

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून याला मान्यता देण्यात आली आहे. या उपचार पद्धतीत कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा हा घटक घेऊन, तो कोरोना विषाणू बाधिताच्या रक्तात सोडला जातो, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र ही पद्धत कोरोना विषाणू ग्रस्तावर उपचारासाठी वापरावी, याचा अद्यापतरी काहीही ठोस पुरावा नसल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

राज्यात १७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले


राज्यात काल कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गुरुवारी राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे

गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर

गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर


जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1075 जणांचा मृत्यू झाला आहे.


24162 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 67 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1823 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत

BREAKING: 3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

BREAKING: 3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत




राज्यात ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आणि अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आलं आहे.

 30 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आला होता. लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता तीन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज्यातील काही ग्रीन झोन भागात अटी शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.राज्यात ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आणि अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आलं आहे. ग्रीन झोन क्षेत्रातील जिल्ह्यात 3 मे नंतर सूट देण्याबाबत हालचालींना आता वेग आला आहे. ग्रीन झोन क्षेत्रात दुकानं, व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ग्रीन झोन परिसरात दुकानं सुरू करण्याबाबत राज्य सरकर अनुकूल आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मेनंतर  देशातील लॉकडाइन बाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्य सरकारचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोशल डिसस्टसिंग नियम पाळून व्यवहार सुरू करता येतील तशी सरकारची भूमिका आहे. फार दिवस सगळे बंद करता येणार नाही. लोकांच्या समस्यांचा विचार करून ग्रीन झोनमध्ये थोडी शिथिलता आणण्याचा विचार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
मुंबई-पुण्यात लॉकडाउन कायम?
मागील सोमवारी 27 एप्रिल रोजी लॉकडाउन आणि पुढील उपयायोजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही राजधानी मुंबई आणि पुण्यात आढळून आली आहे. त्यामुळे राज्यात जर लॉकडाउन वाढवायचा असेल तर तो  मुंबई आणि पुण्यात कायम राहण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील इतर जिल्हे जे रेड झोनमध्ये आहे, त्यांचाही समावेश लॉकडाउन 3 मध्ये असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाउन हा आणखी दोन आठवड्यांसाठी असण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे शहरावर जास्त भर असणार आहे. त्या व्यतिरिक्त जे झोन राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे. त्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे

महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार – शरद पवार

महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार – शरद पवार




लॉकडाउनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभं राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असं आवाहनही केलं. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असल्याने संख्या वाढत असल्याचं सांगितलं.

“४० दिवसांपासून सगळं काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या, शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारचा २०२०-२१ चा जो अर्थसंलकल्प होता त्यात एकंदर राज्याचं महसूल उत्पन्न तीन लक्ष 47 हजार कोटीच्या आसपास जाईल असं चित्र दिसतंय. पण आज सुधारित  माहिती घेतली असता महसूलात तूट पडेल असं दिसतंय. ही तूट १ लक्ष ४० हजार कोटी इतकी असेल. याचा अर्थ एकूण येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम सरकारच्या कामावर झाल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक संकट उभं राहणार असून आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

“मी पंतप्रधनांना यासंबंधी कल्पना दिली आहे. देशाच्या सगळ्या भागांवर हे आर्थिक संकट आहे. आपण सगळ्यांनी यावर चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे,” असं आवाहनही यावेळी शरद पवार यांनी केलं.

“मुंबई, पुणे, जळगाव, मालेगाव, औरंगाबाद येथे करोनाचा फैलाव जास्त आहे. खासकरुन मुंबई, पुण्यात जास्ता प्रभाव दिसत आहे. मुंबई, पुण्यात बहुसंख्य भाग दाटीवाटीचे आहेत. इच्छा असूनही लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळता येत नाही. म्हणून मुंबई पुण्यात संख्या जास्त आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात महापालिका, शासकीय यंत्रणेने कार्यक्रम हाती घेतला असल्यानेही संख्या वाढत आहे. सर्व करोनाचे रुग्ण असतात असे नाहीत. एकंदर आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी आपण घेत आहोत. राज्य सरकारने त्यादृष्टीने पावलं उचलत आहे,” अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.
Here's your unique Code snippet. Click this code to copy it right to your clipboard.